यज्ञ एक वरदान Print E-mail

Yadnyaयज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, पितृयज्ञ इ. चा समावेश आहे.

पुढे वाचा...
 
यज्ञ परिचय
"आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही." सर्व जातींचे-पंथांचे-धर्मांचे स्त्री, पुरुष, कोणत्याही व्यक्तीला या यज्ञ कार्यक्रमात सहभागी होण्याची व मंत्र पठण-हवन करण्याची मुभा आहे; कारण प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा खराखुरा उद्धार करवून घेण्याचा हक्क निसर्गाने दिला आहे. - परमपूज्य सदगुरू श्री.बापट गुरुजी
 
परमपूज्य सद्‍गुरु श्री.बापट गुरुजींचा परिचय Print E-mail

Bapat Gurujiपरमपूज्य श्री.वासुदेव वामन बापट गुरुजी (Shri Vasudev Vaman Bapat Guruji) यांचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. श्रीगुरुजींनी सतत १६ वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे, तसेच सतत ७ वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. श्रीगुरूजींनी इ.स.२००० मधे कल्याण येथे प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र स्थापन केले. इ.स.२००२ मधे १०८ यज्ञ पूर्ण झाले,परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.श्री गुरुजींनी २००५ मधे सुरू केलेल्या सात दिवसांच्या यज्ञ कार्यक्रमांचे सात वर्षांचे चक्र नोव्हें.- डिसें.२०११ मधे झालेल्या नर्मदा परिक्रमेतील यज्ञ कार्यक्रमांत पूर्ण झाले आहे.

पुढे वाचा...
 

  विशेष कार्यक्रम

तीन दिवसीय "शक्ती स्वाहाकार क्र.२" सप्तश्रुंगगड, वणी जि. नाशिक येथे दि. १५,१६ व १७ फेब्रु.२०११ रोजी आयोजीत केला आहे.
श्री.गुरुचरित्र सप्ताह वाचन कार्यक्रम दि.२/२/१२ ते ८/२/१२ या काळात खोपोली येथे संपन्न होणार आहे.
श्रीसद्गुरुंचे विवेचन :
• दि.५ फेब्रु.(सा.५.३०-६.३०), व
• दि.८ फेब्रु.(रात्री ८ नंतर) होईल.
इतर तपशीलासाठी क्लिक करा...
दिनांक ५ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०११ दरम्यान श्रीनर्मदा परिक्रमेअंतर्गत सदगुरुंच्या मार्गदर्शनाखाली ३२० भक्तांना घेऊन बारा यज्ञ, नर्मदापूजन, कुमारीकापूजन, दीपदान, पालखी सोहळा, नामस्मरण, दत्तजयंती, इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे

  संकेतस्थळ अतिथी

"श्रीदत्तात्रेयस्तोत्र" प्रकाशन सोहळा

परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांच्या "श्रीदत्तात्रेयस्तोत्र" या नवीन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा खोपोली येथे दिनांक १० डिसेंबर २०११ रोजी, दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, नर्मदा परिक्रमेच्या अंतर्गत संपन्न झाला. पुढे वाचा...
श्रीनर्मदा परिक्रमा २०११

आगामी कार्यक्रम

यज्ञ क्र.२८१
शतचंडी स्वाहाकार- दि.१३ मे २०१२ (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५; स्थळ:गायत्री गार्डन,कात्रप रोड,बदलापूर(पूर्व))
यज्ञ क्र.२८२
महिम्नस्वाहाकार- दि.१० जून २०१२ (रविवार) (विद्यार्थी सहाय्यता योजना कार्यक्रम)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५; स्थळ:गायत्री गार्डन,कात्रप रोड,बदलापूर(पूर्व))
यज्ञ क्र.२८३
दत्तयज्ञ (श्रीगुरूपौर्णिमा कार्यक्रम)- दि.८जुलै २०१२ (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५; स्थळ:गायत्री गार्डन,कात्रप रोड,बदलापूर(पूर्व))
यज्ञ क्र.२८४
विष्णुयज्ञ- दि.१२ऑगस्ट २०१२ (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५; स्थळ:गायत्री गार्डन,कात्रप रोड,बदलापूर(पूर्व))
यज्ञ क्र.२८५
हरिहर यज्ञ- दि.९सप्टेंबर २०१२ (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५; स्थळ:गायत्री गार्डन,कात्रप रोड,बदलापूर(पूर्व))